Saturday, January 21, 2012

संध्याकाळ


ती धुंद संध्याकाळ
श्रावणात चिंब झाली |
अश्रू गाली ओघळता
मनी हुरहूर सोडून गेली ...

श्वास उरला होता

ओल्या गालांवर माझ्या |
आणि निरव शांतता
निर्जन आयुष्यात माझ्या ...

मनाची गुंत गहिरी झाली होती

हातांची पकड घट्ट झाली होती |
तुझ्या पासून दूर जाताना
तुझी मिठीही ओली झाली होती...

श्रावणधारा धारीनीचे दुःख

रिमझिम ओलावत होत्या |
आभाळ मायेच्या मनीचे सल
हलकेच पाझरत होत्या ...

ती भेट आपली शेवटची

चुकुनही वाटलं नव्हतं |
ती हतबल नजरानजर
अन नभ माथ्यावर फाटलं होतं ...

विरत जाणारा श्वासच

शेवटला राहणार होता |
खोल जाणारा आवाज
लाटनसवे दुरावणार होता ...

क्षण सैरावैरा धावले

कालपलट दूर लोटून |
अरे कितीसा वेळ झाला
असा तुला मला भेटून ...


१२/०१/२०११
प्राची (धुंद फुलपाखरू)...







 

No comments:

Post a Comment