Sunday, January 22, 2012

एकच प्याला


अस्वस्थ जीवनाची
उद्वस्थ ती मदार ,
काळजात बेभानपणे खुपते
कर्माची नांगी कट्यार ...

सत्यासत्य बुडबुडे बनून
अस्तित्वाच्या विषारी हवेत विरतात ,
अस्वस्थतेच्या माथी भोग मारून
निःश्वासाचे घोट गळा उरतात ...

काळीज जळत असतं
अगणित चुकांपाई  ,
खासे बरबटून तळमळत असतं
कोसळताना ठाई ठाई ...

नशाही तशी चढत नाही
मैफिल हि कधी रंगत नाही ,
रंगला मनाचा विडा तरी
सुरताल हि काही साधत नाही ...

डोळे झिंगत जातात
आत्म्याचा चेंदामेंदा होतो ,
परिस्थिती इतका हतबल करते कि
विचारचक्राचाही पेंद्या होता ...

कृष्ण, गीता, अर्जुन, तत्वज्ञान
सारे सारे मित्थ्य वाटतात ,
मग एकच प्याला शिल्लक राहतो
त्यातच सारे स्वर्ग दाटतात ...

जाणीवा भोग बनून
 भोग्याच्या गळा सरसावतात ,
तप्त लाव्हेही त्यापुढे मग
आपले रौद्ररूप आवरतात ...

याही बेधुन्दीत हाती
माती देखील उरत नाही ,
मधुशाळा पाघळून देखील
समाधान कुठशी कळत नाही ...

हृदय जळत असतं
मन तळमळत असतं ,
शरीराचं कणनकणही मग
मृत्यू अभावी भळ
भळत असतं ...

विचारांचा कोंब कुजत असतो
नवा बळी पुन्हा सजत असतो ,
मनातला भेकड माणूसच
क्षणोक्षणी बुजत असतो ...

मदमस्तीचा बाज कोसळून पडतो
शेवटला मुजरा करता करता ,
नवख्याचा साज ढळून जातो
आखरीचा निरोप देता घेता ...  

०८/०८/२००७
प्राची (धुंद फुलपाखरू)

No comments:

Post a Comment